पितृ दोष म्हणले कि आपणास अनेक प्रकारे घाबरून सोडले जाते . पण त्यास न घाबरता सहज व सोप्पे उपाय केल्यास नक्कीच आपल्या जीवनात समृद्धी येऊ शकते.
पितृ कार्य किंवा पितरांस पाणी का देणे कारण आपल्या घराण्यास कुठलेही पितृ दोष असतील किंवा पितृ दोष लागू नये म्हणून पितृ कार्य पितृ पंधरवड्यात करावे. पितृ तर आपलेच असतात पण त्याचे दोष आपणास कसे लागतील पण आपण त्याचे कार्य योग्य प्रकाराने केल्यास त्यास उत्तम गती प्राप्त होते व आपल्या घराण्यावर त्यांचे आशीर्वाद असतात प्राचीन ज्योतिष ग्रंथाप्रमाणे पितृदोष सर्वात मोठा दोष मानला गेला आहे. यापासून पीडित व्यक्तीचं जीवन कष्टदायक असतं. ज्याच्या कुंडलीत हा दोष असतो त्याला पैश्याचा अभाव असतो आणि त्याला मानसिक ताणाला सामोरे जावं लागतं. साधारणात: पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात पण कोणी एवढं खर्च करण्यात सक्षम नसेल तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. बरेच सोप्पे विना खर्च उपाय व उपासना आहेत त्या द्वारे पितृ दोष दूर केले जाऊ शकतात . त्या करिता खर्चीक त्रिपिंडी किंवा कुठल्याही प्रकारची शांती करण्याची आवश्यक्त। नसते. कोणीही खार्चिक उपाय पेक्षा स्वतः रोज विना खर्च उपाय व उपासना केल्या जाऊ शकतात याचा विचार करणे
श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे, गो ग्रास गायीला देणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे. पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. या ऋणातून मुक्त होण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचे स्मरण करावे
उपाय व उपासना
काय घडते पितृ दोष मुळे :-
वर उपाय देण्यात आलेले आहेत . आपणास अजून काही माहिती हवी असल्यास आपण ऑफिसला भेट देणे किंवा खालील दिलेल्या नंबरवर कॉल करणे .
इंडियन स्कूल ऑफ अस्ट्रोलॉजी ” आज पर्यंत ज्योतिष प्रचार व प्रसार च कार्य पुण्यात १२५ वर्षाहून अधिक काळ करत आलेली आहे . आपल्या सर्व समस्यांचे विना खर्च उपाय व उपासने साठी संपर्क करा ९८२३१९५९२५